- Table View
- List View
Talghar: तळघर
by Narayan Dharap“ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते. पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या. तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण… पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला होता. झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते. विलक्षण शांतता. हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल. सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते… जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या… कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती… आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला… उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या… आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता… तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे… काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पर्श्य… त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला… “मी आलो आहे."
Upyojit Itihas Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: उपयोजित इतिहास पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Kalyan Chavanसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने सन 2021-22 पासून बी.ए. तृतीय वर्ष इतिहास सेमिस्टर VI करिता उपयोजित इतिहास (Applied History) हा पेपर अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट केला आहे. मिळविलेल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष व्यवहारात योग्य स्वरूपात उपयोजन झाले तर ते ज्ञान सार्थकी लागले असे म्हटले जाते. त्या दृष्टीने प्रस्तुत अभ्यासक्रमात इतिहासविषयक ज्ञानाचे उपयोजित मूल्य अधोरेखित करण्यावर भर दिलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रकरणात उपयोजित इतिहासाची संकल्पना व इतिहासाचे विविध विषयांशी असलेले उपयोजन तसेच गतकाळ व वर्तमान यांचे सहबंध आणि समकालीन इतिहास इत्यादी घटकांची पायाभूत मांडणी केली आहे. इतिहासाशी संबंधित असणारी पुरातत्त्वशास्त्र, पुराभिलेखागारे, पुराभिलेखीय साधने, वारसा स्थळे व संग्रहालये याचे विवेचन उपयोजनात्मक महत्त्व विचारात घेऊन प्रकरण दोनमध्ये केलेले आहे. आजचे युग ‘माहिती-तंत्रज्ञानाचे युग' आहे. माहितीचा प्रसार करणाऱ्या मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व समाजमाध्यमे यांनी अवघे विश्व व्यापले आहे. या प्रसारमाध्यमांचे सखोल ज्ञान व इतिहास अभ्यासकांना या क्षेत्रात असणारी सेवेची संधी या सर्वांचा ऊहापोह प्रकरण नंबर तीनमध्ये विस्ताराने केलेला आहे.
Anandadayi Ganit class 1 - NCERT - 23: आनंददायी गणित इयत्ता पहिली - एनसीईआरटी - २३
by National Council of Educational Research and Trainingइयत्ता पहिलीसाठी आनंददायी गणित या पाठ्यपुस्तकातील आशय NCF-FS 2022 मध्ये नमूद केलेल्या पुढील चार घटकांवर आधारित आहे तोंडी गणित चर्चा, कौशल्य शिकवणे, कौशल्य सराव आणि गणिती खेळ सर्व अध्यायांमध्ये समाविष्ट केले गेले आहेत. त्यापैकी बहुतेक एकात्मिक पद्धतीने सादर केले आहेत. तथापि, खालील प्रकरणे केवळ गणितीय समज आणि क्षमता विकसित करण्याच्या अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टाशी (CG-8) आणि परिमाणे, आकार आणि मापे यांद्वारा जग ओळखू शकण्याशीच संरेखित नाहीत तर NCF-FS 2022 मध्ये दिलेल्या सर्वांगीण विकासाकडे नेणाऱ्या इतर सर्व अभ्यासक्रम व अभ्यासक्रमिय उद्दिष्टांशीदेखील सरेखित आहेत - मौखिक गणित चर्चा, कौशल्यशिक्षण, कौशल्यसराव आणि गणिती खेळ. बौद्धिक आव्हान आणि विचारप्रवर्तक कार्यांमुळे गणिताचे अध्ययन व निर्णयनक्षमता अधिक चांगल्या प्रकारे होते. मेंदूला सतावणारे प्रश्न, कोडी, कूट प्रश्न यामुळे नेहमीच्या शिकण्याच्या जोडीने मुलांना याची संधी मिळते. मुलांच्या वयाला साजेशी अनेक कोडी या पुस्तकात दिली आहेत.
Anandadayi Ganit class 2 - NCERT - 23: आनंददायी गणित इयत्ता दुसरी - एनसीईआरटी - २३
by National Council of Educational Research and Trainingइयत्ता दुसरीसाठी असलेले आनंददायी गणित असे नाव असलेले गणिताचे पाठ्यपुस्तक NEP 2020, NCF-FS 2022 तसेच पायाभरणीच्या टप्प्यासाठीचा अभ्यासक्रम यांच्या शिफारसी डोळ्यासमोर ठेवून तयार केले आहे। बालवाटिका 1 ते 3 तसेच पहिली झाल्यावर (3-8 वर्षे वयात) दुसरीत जाणाऱ्या मुलाला अंकांचे ज्ञान झालेले असते, असे यात गृहीत धरले आहे। परंतु, आपल्या देशातील विविधता बघता, कदाचित काही मुलांची एकदम शाळेत पहिलीत गेल्यावरच पहिल्यांदा अंकांची ओळख होत असेल, असेही होऊ शकते। हे क्रमिक पुस्तक तयार करताना अशा परिस्थितीचाही विचार केलेला आहे। वयाच्या या टप्प्यावरील मुले मुक्तपणे खेळणे, खेळणी यात रमतात। हे लक्षात घेऊन, अवकाशीय समज, अंकहाताळणी, गणितीय आणि संगणकीय संकल्पना इ। शिकवण्यासाठीच्या उपक्रमांमध्ये खेळ, खेळणी यांचा वापर करण्यासाठी पुष्कळ वाव ठेवलेला आहे। यामुळे प्रत्येक नवीन संकल्पना किंवा कौशल्य शिकताना मूर्त वस्तूंकडून चित्रस्वरूपाकडे व त्याकडून अमूर्त कल्पनांपर्यंतचे संक्रमण सहजपणे होऊ शकते। सर्वांगीण विकासासाठी अनुभवातून शिक्षण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, इयत्ता दुसरीसाठी असलेल्या आनंददायी गणित या पुस्तकामध्ये, वर्गात आणि वर्गाबाहेर करण्यासारखे अनेक उपक्रम दिले आहेत। यातील सर्व प्रकरणांमध्ये, उपक्रमाधारित कार्यांच्या माध्यमातून गणितीय संकल्पनांचे आकलन करून दिले आहे। सक्तीने, नाखुषीने गणित शिकण्याऐवजी, आपण खेळ खेळत आहोत अशा भावनेने मुलांनी हे उपक्रम करावेत आणि त्याद्वारे गणितीय संकल्पना आपोआप रुजाव्यात, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे।
Anolakhi Disha Bhag 1: अनोळखी दिशा भाग 1
by Narayan Dharapगेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणाऱ्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.
Antararashtriya Sambandh 1 TYBA Sixth Semester - RTMNU: आंतरराष्ट्रीय संबंध 1 बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. Shaikh Hashim Dr Jogendra Gawaiराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सन २०१५-१६ च्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. राज्यशास्त्राकरिता सेमिस्टर प्रणालीनुसार संशोधित अभ्यासक्रम लागू केला आहे. या क्रमात राज्यशास्त्राच्या बी.ए. तृतीय वर्ष - सेमिस्टर VI च्या अभ्यासक्रमासाठी 'आंतरराष्ट्रीय संबंध' हा विषय निवडला आहे. प्रस्तुत पुस्तकात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचा आणि विषयाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या 'राजकीय सिद्धांत', 'पाश्चात्य राजकीय विचार', 'भारताचे शासन व राजकारण', 'राज्यांचे शासन आणि राजकारण', 'तुलनात्मक शासन आणि राजकारण' या अनुक्रमे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिला आहे. प्रस्तुत पुस्तक अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्ण समाधान मिळेल आणि अधिक माहितीसाठी जास्तीची पुस्तके चाळण्याची गरज भासणार नाही यादृष्टीने पुस्तकातील प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. तसेच नवीन परीक्षा प्रणाली अनुसार पुरेसे वस्तुनिष्ठ प्रश्नही यात दिले आहेत.
The Darker Side: द डार्कर साईड
by Cody McFadyenअमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीचा (...की मुलाचा?) विमानात, तीस हजार फूट उंचीवर झालेला खून म्हणजे; हिंस्र मधमाशांच्या पोळ्यावर मारलेला दगडच ठरतो. एकामागोमाग एक खून उघडकीस येतात. खुनी माणूस जाहीररीत्या पूर्वसूचना देऊन खून करू लागतो. या खुन्याची शिकार करायला निघाली आहे; एफ. बी. आय. ची स्पेशल एजंट स्मोकी बॅरेट. भूतकाळाचं प्रचंड ओझं मनावर असलेली, एका हल्ल्यात पती व मुलीला गमावून बसलेली, बलात्कार झालेली आणि तरीही त्वेषाने खुन्याला पकडण्यासाठी सज्ज झालेली! कोण बाजी मारणार या अघोरी सामन्यात? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या कथासूत्रात गुरफटून जाण्यासाठी तयार व्हा! लीसा रीडच्या खुन्याचा तपास एजंट बॅरेटच्या हाताखाली चालू असतो, तोच रोझमेरीच्या खुनाची बातमी येते आणि समोर येते, एक काळीकुट्ट खुनांची मालिका…
Digital Bharat: डिजिटल भारत
by Dr Deepak Shikarpurपंचवीस वर्षांनी माहिती तंत्रज्ञानाची गंगा म्हणजेच 'आयटी' भारतात वाहत आहे आणि ती सर्वसामान्य नागरिकांसाठी वास्तव बनली आहे. अंगणी येऊन एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे. मुळात ही संगणकीय क्रांती असली तरी, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (किमान साधे मोबाइल फोन) आल्यापासून त्याचा खरा प्रसार (आणि परिणाम) जाणवू लागला आहे. आपली बरीचशी सरकारी कामे ऑनलाइन होऊ लागली आहेत! किमान बिले भरणे, एखाद्या प्रकरणाची माहिती घेणे, तक्रारी दाखल करणे, संबंधित कार्यालयात पोहोचणे आणि तिथल्या विभागाचा शोध घेणे आणि योग्य अधिकाऱ्याची वाट पाहणे यासारख्या मूलभूत कामांसाठी शहरी-निमशहरी भागातही तासनतास वाया जातात. आणि जतन केलेले मानसिक आणि शारीरिक श्रम (सामाजिक, आर्थिक, आत्म-सुधारणा इ.) इतरत्र वापरा. काही हरकत नाही! आणि हे अगदी घरी केले जाऊ शकते. थोडे कौशल्य आत्मसात केले तर अनेकांना त्यात दूरगामी करिअरच्या (कमाईच्या) संधी मिळतील. इंटरनेट, कनेक्टेड कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन आणि स्वत:चे बँक खाते यांच्या मदतीने - अगदी गृहिणी देखील तिच्या घरातील आरामात पैसे कमवू शकते. एकदा तुम्ही डिजिटल कौशल्यांमध्ये प्रभुत्व मिळवल्यानंतर, तुम्ही अनेक व्यावहारिक, परस्पर पैलू हाताळण्यास सक्षम असाल. "खरीच कर लो दुनिया मुटका" हे स्वप्न आता सहज शक्य झाले आहे.
Gomant Bharati Pushpa Pachave Dviteey Bhasha-Marathi class 12 - Goa Board: गोमंत भारती पुष्प पंचम दुसरी भास-मराठी मानक बारावो - गोवा बोर्ड
by Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandalइयत्ता बारावीसाठी गोमंत भारती पुष्प पाचवे (मराठी द्वितीय भाषा) पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण मंडळाच्या धोरणात्मक आराखड्यानुसार 'मराठी अभ्यास मंडळा'च्या मार्गदर्शनाखाली 'संपादक मंडळा'ने हे पुस्तक तयार केले आहे. त्यामुळे स्थानिक सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक वारसा, लोककथा, वैज्ञानिक दृष्टीकोन, निसर्ग जागृती आणि इतर शैक्षणिक उद्दिष्टे लक्षात घेऊन या पुस्तकातील गद्य आणि पद्य साहित्य निवडण्यात आले आहे. गद्य शैलीची ओळख करून देण्यासाठी धड्यांमध्ये पथनाट्य आणि मुलाखती समाविष्ट आहेत.
Gomant Bharati Pustak Dusare Tritiy Bhasha-Marathi class 9 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक दुसरे तृतीय भाषा-मराठी इयत्ता नववी - गोवा बोर्ड
by Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandalइयत्ता नववीसाठी गोमंत भारती पुस्तक दुसरे (मराठी तृतीय भाषा) पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण मंडळाच्या धोरणात्मक आराखड्यानुसार 'मराठी अभ्यास मंडळा'च्या मार्गदर्शनाखाली 'संपादक मंडळा'ने हे पुस्तक तयार केले आहे. प्रस्तुत पाठ्यपुस्तकामध्ये गद्य विभाग, पद्य विभाग आणि आधुनिक काव्य विभाग असे तीन विभाग आहेत.
Majet Shikuya Marathi Class 1 - Maharashtra Board: मजेत शिकूया मराठी इयत्ता पहिली - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमहाराष्ट्र शासनाने राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांसह सर्व अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून मराठी भाषा विषय अनिवार्य करण्याचा धोरणात्मक निर्णय सन २००९ मध्ये घेतला. 'प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२' मध्येही याच धोरणानुसार, अनिवार्य मराठी हा विषय इयत्ता पहिलीपासून समाविष्ट करण्यात आला आहे. इयत्ता पहिली व दुसरीच्या स्तरावर मराठी हा विषय शिक्षकांनी श्रवण, भाषण व संभाषण या कौशल्यांच्या स्वरूपात शिकवावा आणि त्या विषयासाठी 'पाठ्यपुस्तक' असू नये अशी अपेक्षा आहे; म्हणून इयत्ता पहिलीकरिता मराठी विषयाची ही छोटेखानी पूरक साहित्य पुस्तिका पाठ्यपुस्तक मंडळाने तयार केली आहे. या पूरक पुस्तिकेमध्ये गाणी, गोष्टी दिल्या आहेत. तसेच परिचित, अपरिचित पक्षी, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, फुले, फळे, झाडे यांचा रंगीत चित्रे व शब्दांतून परिचय करून दिलेला आहे. काही सूचना व कृती दिल्या आहेत. शिक्षकांना अध्यापन करणे सुलभ जावे यासाठी पुस्तिकेच्या शेवटी 'दिशा अध्ययन-अध्यापनाची' या शीर्षकाखाली मार्गदर्शन केले आहे. मराठी भाषेचे अध्ययन-अध्यापन परिणामकारक व दर्जेदार होण्यासाठी त्याचा उपयोग करावा.
Pacifikchya Betavaril Katha: पॅसिफिकच्या बेटांवरील कथा
by Somerset Maughamपॅसिफिकच्या बेटांवरील कथा ह्या पुस्तकाचे मूळ लेखक हे सॉमरसेट मॉम असून ह्या पुस्तकाच्या मराठी अनुवादक डॉ. वृषाली जोशी आहेत. ह्या पुस्तकामध्ये सॉमरसेट मॉम यांच्या आयुष्यातील काही प्रसंगाचे वर्णन करण्यात आलेले आहे.
Samajshastriya Sankalpana Ani Samajik Prakriya FYBA Second Semester - RTMNU: समाजशास्त्रीय संकल्पना आणि सामाजिक प्रक्रिया बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Rahul Bhagat Pradeep Aglaveराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२०' नुसार सत्र २०२२-२३ पासून बी. ए. प्रथम वर्ष सत्र-१ आणि सत्र-२ च्या समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल केलेले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित 'समाजशास्त्रीय संकल्पना आणि सामाजिक प्रक्रिया' हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. सदर पुस्तकात नवीन अभ्यासक्रमाचा पूर्णतः समावेश करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी. ए. प्रथम वर्ष सत्र-२ साठी असले तरी महाराष्ट्रातील इतर विद्यापीठातील समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना निश्चितच उपयोगी पडणारे आहे.
Sthool Arthashastra FYBA Second Semester - RTMNU: स्थूल अर्थशास्त्र बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. B.L. Jibhakateनवीन शैक्षणिक धोरण (NEP) २०२० अंतर्गत “स्थूल अर्थशास्त्र" ह्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्राध्यापक मित्र आणि व विद्यार्थ्यांना सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. हे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. भाग १ च्या सेमिस्टर - II च्या नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिले असून ते महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाच्या कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे. अर्थशास्त्रातील काही संकल्पना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थांच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. असा संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून एकाच संकल्पनेकरिता मराठीतील अनेक पर्यायी नावे दिलेली असून इंग्रजीतील प्रतिशब्दही दिलेले आहेत. त्यामुळे परीक्षेत एखादी संकल्पना किंवा सिद्धांत वेगळ्या नावाने विचारण्यात आला तरी विद्यार्थांना त्याचे अचूक उत्तर देता येईल, असा विश्वास आहे.
Swapna Chalun Aale: स्वप्न चालून आले
by Dr Hrishiskesh Pradeep Bodheस्वप्न चालून आले! अरे, व्वा! शाब्बास. थोडा उशीर झाला असेल पण अखेर तुम्ही सुद्धा ह्या विषयाकडे वळलातच. अहो, कोणता विषय काय विचारता ? प्रेमाचा विषय. अनादी काळापासून ते अनंत काळापर्यंत सदा सर्वकाळ मनुष्य जातीसाठी जाज्वल्य असणारा विषय म्हणजे प्रेम. आपली ही एक मस्त मधुर, चटकदार आणि यशस्वी अशी प्रेम कहाणी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर पण ज्यांची प्रेम कहाणी यशस्वी होते ते नशीबवान लोकं आयुष्य खऱ्या अर्थाने अनुभवतात. ज्यांची होत नाही त्यातले काही जण प्रेम कहाणी लिहितात आणि काही आयुष्य भर त्या प्रेमाची प्रतीक्षा करत राहतात. काहींचा इतका ही संयम नसतो म्हणून त्यांचा प्रेमावरून विश्वासच उडतो. त्यांना दुसरी व्यक्ती म्हणजे फक्त वासना पूर्तीच साधन वाटतं. फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक वासना सुद्धा. सरते शेवटी उरतात ती लोकं ज्यांच्यात संयम असतो पण कायमच प्रेमाला मुकलेले असतात. अशा लोकांच्या डोळ्यात सतत प्रेम मिळवण्याची तळमळ दिसते… पण प्रेम असं कधी मिळवता येतं का? प्रेम तर फक्त करता येतं. देता येतं. उधळता येतं. प्रेम फक्त एक भावना किंवा एक घटना नव्हे तर तो एक सतत चा प्रवास आहे. स्वतः पलीकडं जाण्याचा प्रवास . स्वत्वाच्या सीमा तोडून आपल्या सर्वस्वाची उधळण दुसऱ्या अंतरंगावर करत राहण्याचा प्रवास. अंतरंगा द्वारे अनंत मिळवण्याचा प्रवास. ही कहाणी म्हणजे असाच एक गोड गुलाबी आणि गुलजार प्रवास आहे. गायत्री, महेंद्र, श्रुती, वेदांत, गिरिजा, सुजय आणि संचिता यांच्या अंतरंगाचा…
Tanjavarche Marathe Raje: तंजातंजावरचे मराठे राजेवरचे मराठे राजे
by Vinayak Sadashiv Vakaskarमद्रासचे विद्वान इतिहासलेखक श्रीयुत सुब्रह्मण्य यांनी हे पुस्तक संशोधनपूर्वक लिहिले असल्याचे श्रीयुत अयंगार या प्रख्यात इतिहासतज्ञांनी आपल्या उपोद्घातात स्पष्ट म्हटलेच आहे. अशा या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. तो करीत असताना अवश्य त्या विशेष माहितीची भर ठिकठिकाणी घातली आहे. त्या मुळे हे पुस्तक आतापर्यंतच्या माहितीच्या निष्कर्षरूपाने मराठी वाचकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तंजावरचा शिलालेख विस्तृत असून तो मराठी भाषेत खोदविलेला आहे. त्याचे सर्व इंग्रजी भाषांतर श्रीयुत सुब्रड्मण्य यांना न मिळाल्याचे त्यांनी आपल्या भूमिकेत लिहिलेच आहे. तो दुर्मिळ शिलालेख मोठ्या प्रयत्नाने मिळवून मुद्दाम परिशिष्टात दिला आहे. त्यावरून इतिहास अभ्यासूंना अवश्य ते साहाय्य होईल अशी खात्री आहे. शिलालेखाचा सारांश आरंभी दिलाच आहे.
Jane Eyre - Ek Aatmakatha: जेन आयर - एक आत्मकथा
by Charlotte Brontë Mrs Gayatri Salvankar“जेन आयर - एक आत्मकथा” हे शार्लोट ब्रॉंटी यांच्या साहित्यकृतींपैकी एक अमर कादंबरी आहे. या कादंबरीत एका अनाथ मुलीची, जेन आयरची, कथा सांगितली जाते जी जीवनातील संघर्ष आणि प्रेमाच्या शोधात एक प्रेरणादायी प्रवास करते. कथा जेनच्या बालपणीपासून सुरू होते. ती आपल्या क्रूर काकूच्या घरी वाढते, जिच्याशी तिचे नाते फारसे चांगले नसते. नंतर तिला लोवुड शाळेत पाठवण्यात येते, जिथे तिचे शिक्षण होते. या शाळेतील कडक शिस्त आणि कठीण परिस्थिती जेनला स्वावलंबी आणि दृढ बनवते. तिथेच तिला हेलन बर्न्स नावाच्या मुलीशी मैत्री होते, जी तिच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडते. शाळेतून बाहेर पडल्यावर जेन शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात करते. ती थॉर्नफील्ड हॉल येथे रोचेस्टर यांच्या मुलीच्या शिक्षिका म्हणून नेमली जाते. या काळात तिची भेट एडवर्ड रोचेस्टर या रहस्यमय आणि करिष्माई व्यक्तीशी होते, आणि त्यांच्यात एक अतूट नातं निर्माण होतं. जेनच्या सुसंस्कृत आणि स्वावलंबी व्यक्तिमत्त्वामुळे रोचेस्टर तिच्या प्रेमात पडतो. पण थॉर्नफील्ड हॉलच्या भिंतींमध्ये काही गुपितं दडली आहेत. जेनला कळतं की रोचेस्टरचं आधीच लग्न झालेलं आहे आणि त्याची पत्नी अजून जिवंत आहे. ह्या खुलाशामुळे जेन धक्का बसतो आणि ती तिथून निघून जाते. तिने स्वतःच्या स्वाभिमानाला आणि नैतिकतेला जास्त महत्त्व दिलं. तिला नंतर तिच्या पूर्वजांची संपत्ती मिळते, ज्यामुळे तिचे आयुष्य आर्थिक दृष्ट्या स्थिर होते. कथेचा शेवट जेनच्या थॉर्नफील्ड हॉलकडे परतण्याने होतो, जिथे तिला कळतं की रोचेस्टर अपघातात अंध झाला आहे आणि थॉर्नफील्ड हॉल जळून खाक झालं आहे. जेन आपल्या स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून रोचेस्टरसोबत राहायचं ठरवते, त्याच्या अंधत्वातही त्याच्या प्रेमात आकंठ बुडून जातात. “जेन आयर” ही एक प्रभावी कथा आहे जी स्त्रीच्या आत्मनिर्भरतेची, नैतिकतेची आणि प्रेमाच्या शोधाची कहाणी सांगते. शार्लोट ब्रॉंटी यांनी रचलेली जेन आयर ही एक अत्यंत प्रेरणादायक आणि कालातीत नायिका आहे.
Nishchayacha Mahameru: निश्चयाचा महामेरू
by Mahesh Gupte“निश्चयाचा महामेरू अर्थात शिवरायांचे जाणतेपण” हे महेश श्री. गुप्ते लिखित एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. हे पुस्तक महाराजांच्या दृढ निश्चय, धैर्य आणि नेतृत्व गुणांचे गहन विश्लेषण करते. शिवाजी महाराज हे एक महान योद्धा आणि आदर्श नेता होते, ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात एक अमूल्य योगदान दिले. या पुस्तकात लेखकाने शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या कार्याचे विवेचन केले आहे. शिवरायांचा शौर्य, धैर्य, आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे ते आपल्या अनुयायांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण करू शकले. त्यांच्या नेतृत्वात अनेक लढाया जिंकून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. हे पुस्तक शिवरायांच्या राज्यकर्तृत्वाचे वर्णन करताना त्यांच्या युद्धनीती, कूटनीती, आणि जनकल्याणाच्या कार्यांवर विशेष भर देते. शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांवरही या पुस्तकात सखोल चर्चा केली आहे. त्यांच्या जीवनातील घटनांची कथा फक्त एक ऐतिहासिक घटना म्हणून नव्हे तर एक प्रेरणादायी वाचन म्हणूनही दिली आहे. शिवरायांचे आदर्श आणि तत्त्वज्ञान आजच्या काळातही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संबंधित आहेत. त्यांनी सदैव न्याय, समता, आणि धर्मनिरपेक्षता यांचा आदर केला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या अनुयायांना एक नवीन दिशा मिळाली. “निश्चयाचा महामेरू अर्थात शिवरायांचे जाणतेपण” हे पुस्तक केवळ इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठीच नाही, तर जीवनात प्रेरणा शोधत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मार्गदर्शक आहे. शिवरायांचे विचार आणि तत्त्वज्ञान आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचे आणि प्रेरणादायी आहेत.