- Table View
- List View
Samajut Kashi Kadavi
by Ravindra KolheWhile convincing his issue here, Birbal played himself as a small child in the Crusades' Court. In fact, it was not impossible for the crippling of a child. At such a time Birbal used a simple principle. He told to make sugarcane again from finely chopped pieces. It is easy to break, but it is difficult to connect. Birbal had to defeat the Badshah because he asked to do the same.
Samajutichya Goshti Durun Dongar Sajare
by Arun V. DeshpandeThis is a story of Ajay who was attracted toward the rich family boys who went misusing their parents money, later on he realized his mistake and changed his lifestyle in marathi.
Samajutichya Goshti Jibh God Tar Sare Jag God
by Arun V. DeshpandeThis is story of Neha and her family who were very sweet talking family. Neha's birthday was near so they decided to invite all her friends and family friends for a get together and during this function she thought she will be able to tell all her friends and relatives about her brother who had recetly got a new job in marathi.
Samajutichya Goshti Kelyane Hot Ahe Re
by Arun V. DeshpandeThis is a story of Sudhir who was a very good boy and wanted to help everybody, but because of his inability to perform all the jobs accepted by him he was discouraged by people. but one day his teacher explained him his mistakes, he changed himself and became perfect in marathi.
Samajutichya Goshti Man Mothe Asave
by Arun V. DeshpandeNeha was first time selected to play Table tennis competition, but to her surprise she was made Captain of her team, while other two players were senior to her. But due to their ego problem they were not ready to play under each others command, so Neha got this oppurtunity in marathi.
Samajutichya Goshti Shejarchya Aaji
by Arun V. DeshpandeNeha met with a old lady who came to stay in the neighbours house. Neha had a very good time with this old lady who was like her grand mothers, she along with her friends and old lady visited Ashram where many people were staying in marathi.
Samanata: समानता
by Shri. Dinkar Sakrikarप्रस्तुत भाषांतर हे टॉने याच्या ‘इक्वालिटी’ या ग्रंथाचे आहे. या ग्रंथात त्यांनी समानतेच्या संकल्पनेचा अत्यंत सांगोपांग व शास्त्रशुद्ध असा उदापोह केला आहे. त्यांची समानतेची कल्पना ही सामाजिक न्यायाच्या संपूर्ण अशा आकलनावर आधारलेली आहे, समाजाच्या मध्यवर्ती आणि चिरस्थायी अशा प्रक्रियेतच समानता अनुस्यूत असली पाहिजे. समाजातील लोकांचे परस्परांशी उचित संबंध अशी ते समानतेची व्याख्या करतात. हा संपूर्ण विचार त्यांच्या मूळ ग्रंथातूनच समजून घेतला पाहिजे.
Samanata
by Shri. Dinkar Sakrikarप्रस्तुत भाषांतर हे टॉने याच्या ‘इक्वालिटी’ या ग्रंथाचे आहे. या ग्रंथात त्यांनी समानतेच्या संकल्पनेचा अत्यंत सांगोपांग व शास्त्रशुद्ध असा उदापोह केला आहे. त्यांची समानतेची कल्पना ही सामाजिक न्यायाच्या संपूर्ण अशा आकलनावर आधारलेली आहे, समाजाच्या मध्यवर्ती आणि चिरस्थायी अशा प्रक्रियेतच समानता अनुस्यूत असली पाहिजे. समाजातील लोकांचे परस्परांशी उचित संबंध अशी ते समानतेची व्याख्या करतात. हा संपूर्ण विचार त्यांच्या मूळ ग्रंथातूनच समजून घेतला पाहिजे.
Samanya manasashastra FY. BA. Pune University
by B. D. Garuda Dr Bharat Naik. Dadasaheb ShirgaaveSamanya manasashastra Marathi text book for First year from The Pune Universtity in Marathi.
Samanya Manasashastra FYBA First Semester - SPPU: सामान्य मानसशास्त्र एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Arvind Kakulate Prof. Ramdas Kolekarपुणे विद्यापीठ मानसशास्त्र अभ्यासमंडळाने प्रथम वर्ष कला या वर्गाचा मानसशास्त्र विषयाचा सुधारित अभ्यासक्रम तयार केला आणि हा अभ्यासक्रम जून २०१३ पासून अमंलात आणला. सामान्य मानसशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांतील सर्व विद्यार्थ्यांना व मानसशास्त्र जाणून (समजवून) घेणाऱ्या वाचकांना उपयुक्त ठरेल हा विचार करून अगदी सोप्या भाषेत दररोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन आणि आवश्यक त्या ठिकाणी आकृतीच्या मदतीने स्पष्टीकरण दिलेले आहे. हे पुस्तक नामवंत मानसशास्त्रतज्ज्ञ आणि विषयतज्ज्ञ लेखकांच्या ग्रंथांचा आधार घेऊन तयार केलेले आहे. या पुस्तकातील मानवी वर्तनाचे जैविक अधिष्ठान, वेदन-संवेदन आणि अवधान, भावना आणि व्यक्तिमत्त्व या प्रकरणांचे लेखन प्रा. अरविंद काकुळते यांनी केले तर मानसशास्त्र-शास्त्र आणि दृष्टिक्षेप, प्रेरणा, अध्ययन आणि स्मरण, बुद्धी आणि विचार या प्रकरणांचे लेखन प्रा. रामदास कोळेकर यांनी केलेले आहे.
Samanya Vidnyan Class 8 - Maharashtra Board: सामान्य विज्ञान इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneसामान्य विज्ञान इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ‘सामान्य विज्ञान’ या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतूहा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान ‘समजून घ्या व इतरांना समजवा’ हा आहे. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना त्यांची व्यवहाराशी असणारी सांगड समजून सांगितले आहे. या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना ‘थोडे आठवा’, ‘सांगा पाहू’ या कृतींचा उपयोग उजळणीसाठी केला आहे. ‘निरीक्षण व चर्चा करा’,‘करून पहा’ अशा अनेक कृतीतून विज्ञान शिकवले आहे. ‘जरा डोके चालवा’, ‘शोध घ्या’, ‘विचार करा’ अशा कृती तुमच्या विचारप्रक्रियेला चालना देतील.
Samanya Vidyan class 8 - Maharashtra Board: सामान्य विज्ञान इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneसामान्य विज्ञान इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ‘सामान्य विज्ञान’ या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतूहा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान ‘समजून घ्या व इतरांना समजवा’ हा आहे. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना त्यांची व्यवहाराशी असणारी सांगड समजून सांगितले आहे. या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना ‘थोडे आठवा’, ‘सांगा पाहू’ या कृतींचा उपयोग उजळणीसाठी केला आहे. ‘निरीक्षण व चर्चा करा’,‘करून पहा’ अशा अनेक कृतीतून विज्ञान शिकवले आहे. ‘जरा डोके चालवा’, ‘शोध घ्या’, ‘विचार करा’ अशा कृती तुमच्या विचारप्रक्रियेला चालना देतील.
Samanya Vigyan class 6 - Maharashtra Board: सामान्य विज्ञान इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneसामान्य विज्ञान इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सोळा प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात सामान्य विज्ञान विषयाच्या अपेक्षित क्षमता नमूद केल्या आहेत. या क्षमतांच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकातील आशयाची नावीन्यपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी निरीक्षण करणे, कृतींच्या आधारे माहिती मिळविणे, माहितीचे संकलन करणे व त्यानुसार वर्गीकरण, अनुमान करणे, निष्कर्ष काढणे इत्यादींवर आधारित कृती, उपक्रम व आशयासाठी पुस्तकात विविध शीर्षकांचा वापर केला आहे. पुस्तकात दिलेली पूरक माहिती विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक परिणामकारक करू शकेल.
Samanya Vigyan class 7 - Maharashtra Board: सामान्य विज्ञान इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneसामान्य विज्ञान इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. विज्ञानाच्या या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू “समजून घ्या व इतराना समजवा” हा आहे. 'निरोक्षण व चर्चा करा', 'जरा डोके चालवा', 'शाधा पाहू', 'विचार करा' अशा अनेक कृतीतून तुम्ही विज्ञान शिकणार आहात. या सर्व कृतीमध्ये भाग घ्या. थोडे आठवा', 'सागा पाहू' या कृतींचा उपयाग उजळणीसाठी करा. पाठ्यपुस्तकात 'करून पहा', 'करून पाहूया' अशा अनेक कृताचा आणि प्रयागाचा समावेश केलेला आहे. या विविध कृती, प्रयाग, निरीक्षणे तुम्ही स्वतः काळजीपूर्वक करा. तसेच आवश्यक तेथे तुमच्या शिक्षकांची, पालकांची व वर्गातील सहकाऱ्यांची मदत घ्या. पाठांमध्ये काही ठिकाणी तुम्हांला माहिती शोधावी लागल, तो शोधण्यासाठी ग्रंथालय, तत्रज्ञान जस इंटरनेट याचीही मदत घ्या.
Sambhaji: संभाजी
by Vishwas Patilऔरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी, कवी-राज्यकर्त्यांची आणि पराक्रमी सेनानीची गाथा संशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती! आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांना सह्याद्रीच्या निबिड दर्याखोर्यांनी, सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांची चित्तथराक, वादळी, पण वास्तव गाथा!!
Samidha FYBA - SPPU: समिधा एफ.वाय.बी.ए. - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Sadhana Amteबाबा आमटे यांच्या लोकविलक्षण जीवनाला साथ देत असताना साधनाबाईंनी अपार कष्ट केले, अग्निदिव्ये म्हणावीत अशा प्रसंगांतून निर्भयपणे वाटचाल केली आणि हे सारे सहजतेने व आनंदाने सोसताना त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्यही टिकविले. बाबा आमटे यांचे कार्य किती महान आहे याचे अधिक वर्णन करण्याची आवश्यकता नाही. पण त्याचबरोबर त्यांच्या स्वभावात अद्वितीय सहानुभूती आणि जबरदस्त तापटपणा, असामान्य सहृदयता आणि तत्त्वांचा आग्रह धरताना पत्नीच्या होरपळीकडे त्यांनी काही वेळा केलेली डोळेझाक अशी एक विलक्षण विसंगती आहे. बाबांच्या वादळी जीवनात त्यांना साधनाताईंनी जी आयुष्यभर साथ दिली तिची अद्भुतरम्य कहाणी असे या आत्मकथेचे स्वरूप आहे.
Sampurn Gadkari Khand 1: संपूर्ण गडकरी खंड १
by Ram Ganesh Gadkariनाटककार, विनोदी लेखक आणि कवी म्हणून ख्यातनाम असलेले राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांचे सर्व साहित्य मराठी वाङ्मयाचे भूषण मानले जाते. गेली जवळजवळ शंभर वर्षे या थोर साहित्यकाराच्या प्रतिभेतून निर्माण झालेले वाङ्मय महाराष्ट्राने शिरोधार्य मानलेले आहे. आजही त्यांच्या साहित्याची लोकप्रियता अणूमात्र कमी झालेली नाही. त्यामुळे गडकरी यांचे समग्र वाङ्मय, ज्याला आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची प्रदीर्घ अशी विश्लेषक व आस्वादक समीक्षा प्रस्तावने च्यारुपाने लाभली आहे, ते गडकरी जन्मशताब्दीच्या निमित्ताने पुनर्मुद्रित करावे असे तत्कालीन मंडळाच्या अध्यक्षांनी व सदस्यांनी ठरविले व १९८४ मध्ये ‘संपूर्ण गडकरी’ हा ग्रंथ दोन भागामध्ये प्रकाशित करण्यात आला. ही पुनर्मुद्रित आवृत्ती यथाकाल संपली. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या या महान साहित्यिकाचे पुनःस्मरण करावे या हेतूने गडकऱ्यांच्या समग्र साहित्याच्या दोन्ही खंडाचे पुन्हा एकवार मुद्रण करून ते महाराष्ट्राच्या नव्या पिढीला उपलब्ध करून द्यावे, असे विद्यमान मंडळाने ठरवले. त्यानुसार आज गडकरी वाङ्मयाचे दोन्ही खंड मराठी वाचकांना सादर होत आहे.
Samrajyavadi Shadyantra: साम्राज्यवादी षड्यंत्र
by Dr Shanta Kothekar Sau Suman Vaidyaप्रस्तुत पुस्तक “साम्राज्यवादी षड्यंत्र” हे अलबर्ट काहन आणि मायकेल सेयर्स या अमेरिकन लेखकांच्या “The Great Conspiracy against Russia” ह्या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद आहे. जागतिक शांतता टिकून राहण्याकरिता इतर कोणत्याही गोष्टीमुळे झाले नसेल इतके मोलाचे योगदान या ग्रंथामुळे झाले आहे. ग्रेट ब्रिटन, अमेरिका व रशिया यांत परस्पर सलोखा व सद्भाव असला तरच जगात खऱ्या अर्थाने टिकावू शांतता नांदू शकेल. रशियन क्रांतीनंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचे दर्शन रशियाच्या अनुभवांच्या चष्म्यातून या ग्रंथाद्वारे लेखकांनी घडविले आहे; रशियनांना आपल्याबद्दल काय वाटते हे त्यांनी आपल्याला जाणवून दिले आहे. या ग्रंथात वर्णन केलेल्या कारस्थानांसारखी सोविएतविरोधी कारस्थाने जर अशीच चालू राहिली तर त्याचा परिणाम तिसऱ्या महायुद्धात होईल हे उघडच आहे. म्हणूनच जागतिक शांतता टिकावी याची कळकळ असलेल्या सर्व ब्रिटिश व अमेरिकन मुत्सद्यांनी, एवढेच नव्हे तर त्या दोन्ही राष्ट्रांतील सामान्य नागरिकांनीही या ग्रंथाचे परिशीलन करणे अगत्याचे आहे. आज संपूर्ण मानव जात सर्वसंहारक अशा स्टार वॉरच्या भयाने भयाकुल झालेली असता या विनाशकारी परिस्थितीची बीजे कशी व कोठे रोवली गेली यावर प्रकाशझोत टाकण्याच्या दृष्टिने हा ग्रंथ अतिशय मोलाचा ठरतो.
Samudrasapharivaruna Ghari Parata
by Subhadra Sen Guptaबसवा आणि त्याची बहीण सुंदरी पल्लवांच्या काळातल्या ममल्लापूरम या बंदर - शहरात राहतात. त्यांचे वडील कंबोजच्या समुद्रसफरीवरून अजून घरी परतले नाहीत म्हणून ती दोघं चिंतेत आहेत. वडिलांच्या जहाजाची माहिती शोधायला ते बंदरावर जातात. पण तिथले विदेशी खलाशी त्यांची भाषा बोलू शकत नाहीत! ते त्या विदेशी खलाशांबरोबर संवाद साधू शकतात का? हे जाणण्यासाठी ही गंमतीदार गोष्ट वाचा!
Samudrat Bhutataki
by Rajiv TambeOne day the school decide to organize examination on the beach. Joshi sir did not know swimming and everybody wanted him to learn. All of them go on the beach far away on a ship where there is no one. Raina’s Loving Ghost helps them enjoy their educational trip. All of them have fun including the principal.
Sandeh: संदेह
by Ratnakar Matkari‘मी श्रीनाथ आहे असं मला वाटतं... अजूनही वाटतं... आतून आम्ही एकच आहोत. कधी मी त्याच्या नावाचा मुखवटा वापरला- कधी त्यानं माझा मुखवटा घालून लोकांना चकवलं! शेजारून एक जीप झपकन गेली. अगदी घासून जाईल इतक्या अंतरावरून! ``दे आर आऊट टु किल अस. श्रीनाथच्या स्वरात घबराट होती. दे आर आऊट टु किल अस! नियतीचा हा शेवटचा डाव आहे का- आम्ही दोघांनी एकत्र मरावं असा? ओरिजिनल आणि डुप्लिकेट या दोघांनाही, त्यांच्या प्रियतमेसकट नष्ट करावं, असा? जीप पुन्हा एकदा झपकन जवळून गेली... घार जशी झडप घालते आणि नेम चुकला की पुन्हा तयारी करण्यासाठी दूर जाते, तशी पुढं गेली... काय होणारेय आता? आम्ही तिघं- नियतीच्या हातची खेळणी... कुठल्या प्रवासाला निघालोय? कुठवर श्वास रोखून वाचाल अशा या दहा कथा. प्रत्येक कथा जबरदस्त संदेह निर्माण करणारी. ताण शेवटपर्यंत वाढवीत नेणारी. मराठीतल्या, अगदी मोजक्या स्वतंत्र संदेहकथांपैकी या दहा. संदेहनिर्मितीबरोबरच मानवी मनाचे झोक्यावरचे खेळही दाखवणाऱ्या. कधी मनाची उंची मोजणाऱ्या... कधी त्याचा तळ गाठणाऱ्या. हेच रत्नाकर मतकरी यांच्या कथालेखनाचं वैशिष्ट्य. त्यांची कथा केवळ चित्तथरारक असत नाही- ती मेंदूलाही झिणझिण्या आणते. इथं प्रथमच संग्रहित झालेल्या त्यांच्या या दहा कथा, रत्नाकर मतकरींची या वेगळ्या विषयावरची हुकमत पुन्हा एकदा सिद्ध करतात. स्वतंत्र संदेहकथाकार म्हणून त्यांचं अद्वितीय स्थान निश्चित करतात.
Sanganak
by A. Dnya. PuranikIn this story Tejal playing with computer gathering lot information..in marathi
Sangharsh Tala: संघर्ष टाळा
by Dada Bhagwanदैनंदिन जीवनात संघर्षाचे निराकरण करण्याची गरज सर्वांना समजते. आपण संघर्षामुळे आपले सर्वकाही बिघडवून टाकतो. हे योग्य नाही. रस्त्यावर लोक वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. लोक मनमानी करत नाहीत कारण तसे केल्याने टक्कर होऊन मरून जातील. टकरेमध्ये जोखीम आहे. त्याचप्रमाणे व्यावहारिक जीवनात संघर्ष टाळायचे आहेत. असे केल्याने जीवन क्लेशरहित होईल व मोक्ष प्राप्ती होईल. जीवनात ही क्लेशाचे कारण म्हणजे जीवनाच्या नियमांची अपूर्ण समज हे होय. जीवनाचे नियम समजण्याबाबतीत आपल्यात मूलभूत कमतरता आहे. ज्या व्यक्ति कडून आपण हे नियम समजून घेतो, त्या व्यक्तीस हया नियमांची ह्यांची सखोल समज असायला हवी. ह्या पुस्तकाद्वारे तुम्हाला समजेल की संघर्ष का होतो. संघर्षाचे काय काय प्रकार आहेत, आणि संघर्ष कसा टाळावा की ज्यामुळे जीवन क्लेशरहित होईल. ह्या पुस्तकाचा उद्देश म्हणजे तुमचे जीवन शांति आणि उल्हासाने भरणे हा आहे, तसेच मोक्ष मार्गावर तुमचे पाऊल मजबूत करणे हा आहे.
Sankatat Dhavun Yenare Char Mitra
by Baba BhandThis is a story of four friends’ rat, deer, crow and the tortoise. They help each other to save themselves from the enemy. Here in this story the deer is trapped in the net of a hunter. The rat and the other friends save themselves from the hunter.