- Table View
- List View
Shri Dnyaneshwari Muktachintan: श्री ज्ञानेश्वरी मुक्तचिंतन
by Sau. Shailjadevi Vahinisaheb Pratinidhiसौ. शैलजादेवी प्रतिनिधि यांनी लिहिलेल्या “श्रीज्ञानेश्वरी मुक्तचिंतन” या ग्रंथामध्ये गीतेच्या वा ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायावर एक एक प्रकरण आहे. ह्या ग्रंथात श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी श्रीमद्भगवद्गीतेतील तत्त्वप्रणालीवर केलेले विवेचन मार्मिक आणि सरल शैलीत प्रस्तुत केले आहे. ज्यांना भारतीय तत्त्वज्ञानाच्या मूलभूत गूढ सिद्धान्ताचा अभ्यास करण्याची संधी मिळालेली नसेल त्यांनादेखील हा विषय समजावा ह्या हेतूने सर्वधर्मीय संतमहात्म्यांच्या चरित्रातील माहिती देऊन, तसेच सामान्य वाचकालादेखील त्याच्या जीवनक्रमांत येणाऱ्या निरनिराळ्या अनुभवांचे दाखले देऊन, ओघवती व रसाळ भाषेत विश्लेषण केले आहे आणि प्राचीन भारतीय दार्शनिक सिद्धान्ताची प्रसंगवशात् थोडक्यात माहिती दिली आहे. अध्यात्माची गोडी असणाऱ्यांना ह्या ग्रंथाच्या वाचनाने निश्चित लाभ होईल. श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या प्रभावामुळे महाराष्ट्र सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अत्यंत संपन्न झाला. वर्तमानकालीन व भविष्यकालीन मराठी वाचकांना त्या संपन्नतेची जाणीव देण्याचे सत्कार्य या ग्रंथाकडून होऊ शकेल.
Shri Keshav Kshirsagar Wangmayin Lekhsangrah: श्री. केशव क्षीरसागर वाङ्मयीन लेखसंग्रह
by Prof. Shri K. Kshirsagarप्रा. श्री. के. क्षीरसागर यांनी १९३० ते १९७९ या पन्नास वर्षांच्या काळात लिहिलेल्या परंतु अद्याप ग्रंथनिविष्ट न झालेल्या लहानमोठ्या एक्याऐशी वाङ्मयीन लेखांचा या संग्रहात समावेश केला आहे. या पुस्तकामुळे आपणांस त्यांची वाङ्मयीन मते नव्यानेच कळणार आहेत असे नाही. पण वेगवेगळ्या नियतकालिकांच्या संचात विखुरलेले त्यांचे विचारधन एकत्र मिळालेले आहे. या लेखसंग्रहात साहित्य आणि स्वातंत्र्यसंग्राम, साहित्य आणि जीवन, मराठी वाङ्मयावरील परकीय संस्कार, कलावंताचे चारित्र्य, आधुनिकता क्या चीज है, अशांसारखे प्रश्न उत्पन्न करणारे लेख आहेत.
Shriman Yogi - Novel: श्रीमान योगी - कादंबरी
by Ranjit Desaiरणजित देसाईंची महत्त्वाकांक्षी कादंबरी म्हणजे ‘श्रीमानयोगी’. शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू, अष्टावधानी युगपुरुषाची व्यक्तिरेखा उभी करणे हे प्रचंड मोठे आव्हानच. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत इतिहासकारांचे दृष्टिकोन वेगळे. अशा अडचणीच्या वाटातून मार्ग काढून ललित वाङ्मयाच्या रूपात महाराजांना साकार करण्याचे काम जिकरीचे, त्यातून शिवाजी माहाराजांची ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित वाङ्मयात वास्तवरूपात प्रथम चित्रित करण्याचे श्रेय निश्चितच रणजित देसाई यांचे आहे. श्रीमानयोगी वाचतानाही महाराजांची जी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. त्यातून इतिहास व काल्पनिकता वेगळी काढता येत नाही. ही कादंबरी लिहीताना देसाईंनी शिवाजीराजांबद्दलचा इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका या सार्यांचा वापर केला आहे. भारताच्या किंबहुना जगाच्या इतिहासाचे अवलोकन केले तर नव्याने राज्य निर्माण करणारे थोर राजे, सेनानी आपणांस आढळतील. त्या प्रत्येक प्रसंगात नेभळट राजास पदच्युत करून आपले राज्य प्रस्थापित केलेले आढळते. येथे निर्मात्याला राज्याची सर्व व्यवस्था, सेना हातात आयती मिळालेली आहे व त्याच्या जोरावर प्रस्थापित राज्य उधळून जेत्याने स्वतःचे राज्य स्थापन केले. महाराजांच्या बाबतीत त्यांनी शुन्यातून सुरवात केली आहे. चार बलाढ्य सत्तांचे राज्य कोरत महाराजांनी आपले स्वराज्य उभारण्यास सुरवात केली. या सत्ता बलाढ्य होत्या. राजनीतिज्ञ, युद्धशास्त्रात पारंगत होत्या. अशा शत्रूंशी अखंड झुंजत महाराजांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. असे कर्तृत्त्व दाखवणारा दुसरा राजा इतिहासात आढळत नाही. इथेच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकिकत्त्व सिद्ध होते. प्रजाहितदक्ष राजा, थोर सेनानी, मुत्सद्दी, धर्मसहिष्णू या सर्व विशेषणांमधील महाराजांच्या तोडीची दुसरी व्यक्ती आढळत नाही. महाराजांचे राजकीय कर्तृत्व, संघर्ष, वेदना यांचे सुयोग्य प्रकटीकरण ‘श्रीमानयोगी’ मध्ये झालेले आहे. या कादंबरीत महाराजांच्या व्यक्तित्त्वाचा होणारा विकास क्रमाक्रमाने उदात्ततेकडे घडत गेलेला आढळून येतो.
Shuddha Harikatha
by Shivkumar BaijalThis is a story of Saint Ramdas. He had seen God many times but wanted that other people should also see him. God tells him to invite people and tell them the pure word. Saint Ramdas started sharing the word and started worshiping God.he was engrossed in his singing with closed eyes and the people slowly started going. In the end, he was left alone worshiping and God appears to him. God tells him that in true worship also God manifests himself.
Shyamchi Aai
by Sane GurujiThis a story of Shyam. he lived in small village. He dont like swimming, but mother force him to do swim. read story what happens.
Shyamchi Aai: श्यामची आई
by Sane Guruji"श्यामची आई" ही साने गुरुजींनी लिहिलेली खास मराठी कादंबरी आहे. ह्या कादंबरीत श्याम अशी एक छोट्या मुलाची गोष्ट आहे, ज्याच्यात त्याच्या आईच्या प्रेमाची, बलिदानाची आणि समर्पणाची भावना आहे. या पुस्तकात आपल्याला श्यामच्या बालपणातील खास अनुभवांच्या अंगणात घेऊन जाता येते, ज्यामध्ये त्याच्या आईने त्याला दिलेल्या शिक्षणांची व उपदेशांची मालिका दर्शवलेली आहे. या पुस्तकाच्या मुख्य विषयांमध्ये आईच्या प्रेमाचे आणि त्याच्या बलिदानाचे महत्वाचे संदेश आहेत. ह्या पुस्तकातील प्रत्येक अध्यायात आपल्याला एक नैतिक शिक्षा किंवा प्रेरणादायी संदेश मिळतो. श्यामची आई हे पुस्तक मराठी साहित्यात एक महत्वाची ठराविणारी कादंबरी आहे आणि ह्याची प्रेरणा आणि संदेश आजपर्यंतही अनेक वाचकांच्या हृदयांत जगावते.
Sialkot Gatha: सियालकोट गाथा
by Ashwin Sanghiअरविद आणि अरबाज या सारख्यासारख्याच दोन ‘व्यापाऱ्यांच्या’ आयुष्यातील चढउतार. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात वरचढ ठरण्यासाठी ते जगातला प्रत्येक नियम मोडत भयावह आणि घातक योजना आखतात. आणि त्यांची इच्छा नसूनही त्यांची आयुष्यं त्यांना पुन्हापुन्हा एकमेकांसमोर आणून उभी करतात. कथेचे धागे अत्यंत कुशलतेने गुंफणारे निष्णात कथाकार अश्विन सांघी पुन्हा एकदा भूतकाल आणि वर्तमानाचे, वास्तव आणि कल्पनेचे, इतिहास आणि दंतकथेचे, व्यवसाय आणि राजकारणाचे, प्रेम आणि द्वेषाचे धागे एकत्र गुंफत आहेत. अनेक पातळ्यांवर घडणाऱ्या घटना असणाऱ्या या चित्तथरारक गोष्टीत ते तुम्हाला उत्कंठेच्या कड्याच्या टोकावर सतत झुलवत ठेवतात आणि तिच्या अनपेक्षित शेवटाचा तुम्ही फक्त अंदाज बांधत राहता.
Sinh Ani Sasa
by P. G. SahasrabuddheOne day an old rabbit saves itself and all the other animals from a lion by making him jump in the well. The lion was supposed to eat the rabbit. But the rabbit tells him about another lion in the jungle. The lion gets angry and goes to see it. He sees his own image in the water and jumps into the well.
Sinh Ani Sinhin
by T. T. SawantThere was a big forest on the top of the mountain. A lion and Lioness decided to live in a cave. they were happy in a jungle.
Sinha Ani Mulaga
by Vishal TaydeThere was a boy looking after a cow. The boy gets lost and he goes searching for it. In the jungle a lion attacks the boy. The boy takes shelter on a tree for two days the lion waits under the tree to pounce on him. Four hunter come with guns and kill the lion and rescues the boy.
Sinhala Chakavile
by L. G. ParanjapeA Lion lived in a jungle. He was cruel and giving a lot of trouble to other animals in the jungle. One day Jungle committee of animals had decided that each of animal to went lion cave every day. Later the fox turn came. He thought a trick and lion killed.
Sinhobachi Phajiti
by Vishal TayadeThere was only one animal who was not afraid of the lion. The lion together with other animals plans to attack him. The elephants were strong and fling the lion away with his trunk and all the other animals run away. The lion tells his fellows not to give this news to other animals in fear of shame. But somehow the news spread in the jungle about the defeat.
Sita Mithilechi Yoddha - Novel: सीता मिथिलाचे वॉरियर - कादंबरी
by Amish Tripathiसीता: मिथिलाचे वॉरियर ऑफ मिथिला हे भारतीय लेखक अमिश त्रिपाठी यांचे एक काल्पनिक पुस्तक आहे जे 29 मे 2017 रोजी प्रसिद्ध झाले होते. हे राम चंद्र मालिकेचे दुसरे पुस्तक आहे. मालिका ही रामायण ही भारतातील सर्वात प्रसिद्ध महाकाव्य आहे. मालिकेतील प्रत्येक पुस्तक रामायणातील एका महत्त्वपूर्ण पात्रावर केंद्रित आहे. सीताः मिथिलाचा योद्धा सीतेच्या कथेवर लक्ष केंद्रित करतो. हे पुस्तक लक्ष्मीचे अवतार मानल्या जाणार्या कल्पित भारतीय राणी सीतेवर आधारित आहे. हे शीर्षक त्याच्या फेसबुक पेजवर लेखकाने उघड केले. मिथिलाचा राजा जनक या कथेतून एक मुलगी शेतात सोडलेली आढळली. लांडग्यांच्या पॅकमधून गिधाडचे तिचे रहस्यमयपणे संरक्षण केले जाते. राजा जनक तिला दत्तक घेतात पण राजा रावणच्या राक्षसासारख्या वासनांपासून भारताच्या दैवी भूमीच्या रक्षणासाठी ही अनाथ मुलगीच असेल याची त्यांना आश्चर्य वाटली नव्हती. सीतेचे बालपण आणि शिकार, तिचे रामसोबतचे लग्न आणि शेवटी तिचा 14 वर्षांचा वनवास, तिचा पती राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण यांच्यासह होते.
Sitech Hatt
by S. R. DevaleHere Ravana deceives Ram and Lakshman. He sends a golden deer to attract Sita. She gets the desire to get the golden deer. First Ram goes after the deer then Lakshman left. Sita remains lonely. Ravana has got an opportunity. He became a monk. He took up Sita. He went straight to Lanka.
Sona Aaila Madat Karte
by Vinita Krishnaसोना मूळचीच हुशार. तिनं आपल्या बाबांना कशी मदत केली, हे तुम्ही कदाचित वाचलं असेल. या गोष्टीत, आई जे काम करते आहे, तेच तिलाही करायचं आहे.
Soneri Hans
by Nirmala SaradaThere was a goose and it had golden feathers. The goose saw that an old lady and her family were going through a tough time. They were very poor. The goose made them rich by giving them one golden feather every week. After few days the old lady becomes greedy. She catches the goose and starts plucking all the feather and so happens that the feather loses its gold and becomes ordinary feathers. The goose warns the old lady for her greed and goes away.
Songadya Phasala
by Ramkrushna ChaudhariA fox was tired of hunting and eating every day. He wanted a hassle free life. He wears a sheep’s skin and starts staying with them. The shepherd unknowingly locked him along with the ship. The fox ate every day and stayed nicely. One day the shepherd receives some guest. He cuts this fox thinking it as a sheep.
Sonyacha sula
by Shrimati Tara ChudhariThe king asked Birbal, who is the honest and dishonest in this world? Birbal answer to the king that Dogs are trustworthy and son in law are not. The king passes an order that all the son-in-laws be crucified, but Birbal saves them all.
Sonyasarakhi Sandhi
by Shakuntala PhadanisIt is a story of married couple, Bhiva and Shevanta. Bhiva was a woodcutter. One day, He went to the forest for cutting the tree.While cutting one tree, an angel came and told not to cut this tree. Bhiva asked for something in return, so the angel gave him one bead. She said to him that makes three wishes before the sunset. Later Bhiva and Shevanta makes three wishes.
Speedpost: स्पीडपोस्ट
by Shobha Deआई आणि मुलांमधला रक्तबंध आदिम... शरीराने आणि मनानेही काळजाशी घ्ट्ट बांधलेला! सुंदर, निरामय जीवनमूल्यांना पैशाच्या दावणीशी बांधून मानवी नात्यांमधला प्राणच शोषू पाहाणार्या आधुनिक अर्थसत्तेने आई मुलांच्या नात्याला नवं परिमाण दिलं आहे. हादरे आणि आव्हानही दिलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम लेखिका शोभा डे यांनी आधुनिकतेच्या झंझावातात जगणार्या आपल्या सहा मुलांना लिहिलेली ही पत्रं... जगातल्या कुठल्याही आईला तिचीच वाटतील अशी! गोंधळून टाकणार्या, जीवघेण्या स्पर्धेत लोटून उद्ध्वस्त करणार्या दुनियेशी टक्कर देणं अपरिहार्यच बनलेल्या आपल्या मुलांसाठी कुणाही आईचं काळीज तुटावं, अशा प्रत्येक विषयाची चर्चा या पत्रांमध्ये आहे.
Startup Karyakari Samarthan FYB.COM New NEP Syllabus - RTMNU: स्टार्ट-अप कार्यकारी समर्थन एफ.वाय.बी.कॉम. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Milind Gulhane Dr Prabhakar Motghareपुस्तक “स्टार्टअप” हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार तयार करण्यात आलेले आहे. या पुस्तकाचा वापर पहिल्या वर्षासाठी (FY B.Com.) केला जातो. हे पुस्तक विद्यार्थ्यांना स्टार्टअप एक्झिक्युटिव्हच्या भूमिकेसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचा सखोल अभ्यास करून, त्यांना आधुनिक उद्योजकतेकडे मार्गदर्शन करते. यात स्टार्टअप प्रक्रियेची माहिती, रोजगार संधी, SWOT विश्लेषण, विविध संघटनात्मक रचना, कायदेशीर बाबी आणि व्यावसायिक नियोजन आदी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. भावनिक बुद्धिमत्ता, वेळ व्यवस्थापन, नेटवर्किंग, समस्या सोडवण्याची क्षमता यावरही भर दिला आहे. या पुस्तकाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायविषयक विचारसरणी विकसित होत असून, त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि बाजारात यशस्वीपणे टिकून राहण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळते.
Steve Jobs: स्टीव्ह जॉब्झ
by Walter Issacson‘ज्या लोकांना असा वेडा विश्वास असतो, की ते जगही बदलू शकतात... तेच जग बदलतात.’ ‘अॅपल'च्या या जाहिरातीप्रमाणेच स्टिव्ह जॉब्सनं जग बदलून दाखवलं.’ त्याचीच ही कहाणी. जॉब्सच्या सुमारे ४० मुलखाती घेऊन लेखक वॉल्टर आयझॅक्सन यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. विलास साळुंखे यांनी या पुस्तकाचा रसाळ अनुवाद केला आहे. या सर्जनशील व्यक्तिमत्वामुळे सहा क्षेत्रांमध्ये क्रांती झाली. ती म्हणजे कम्प्युटर, अॅनिमेटेड चित्रपट, संगीत, फोन, टॅब्लेट कम्प्युटर आणि डिजीटल प्रकाशन व्यवसाय. जॉब्सच्या या कार्याचा आलेख पुस्तकात येतो. जॉब्स आणि त्याच्या कुटुंबियांच्या छायाचित्रांचा समावेशही पुस्तकात केला गेला आहे.
Sthool Arthashastra 1 Paper 2 SYBA Third Semester - SPPU: स्थूल अर्थशास्त्र १ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr S. B. Kale Dr G. K. Sanapसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष कला शाखेसाठी विशेष स्तरावर अर्थशास्त्र हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पेशल पेपर - 2 स्थूल अर्थशास्त्र भाग-1 साठी अभ्यास मंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिले आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काही जास्तीचे मुद्देदेखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासासाठी आकृत्यांची विशेष आवश्यकता असते. आवश्यक त्या सर्व ठिकाणी सुबक आकृत्या व तक्ते देऊन विषय समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी, आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परिभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.
Sthool Arthashastra 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: स्थूल अर्थशास्त्र २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr D. G. Ushir Dr S. B. Kale Dr G. K. Sanap Dr S. R. Jawaleद्वितीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र हा विषय विशेष (Special) घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थूल अर्थशास्त्र भाग-2 हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून स्थूल अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या घटकांचा सर्वसमावेशक अभ्यास व्हावा या दृष्टीने स्थूल अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परिभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील कटाक्षाने विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.