- Table View
- List View
Bhartiya Samaj Sanrachanatmak Samasya TYBA Fifth Semester - RTMNU: भारतीय समाज संरचनात्मक समस्या बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Daya Pandeyप्रस्तुत पुस्तक रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. भाग-३ च्या पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांना भारतीय समाज व त्यांच्या समस्यांची ओळख व्हावी तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग व्हावा या उद्देशाने लिहिले आहे. वर्तमानकाळात स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यापीठीय अभ्यासक्रमात मोठे बदल होत आहेत. या बदलांच्या अनुषंगाने विद्यापीठातील बी.ए. च्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना झालेली आहे. बी.ए. च्या पदवीसाठी तसेच स्पर्धात्मक परीक्षेसाठी समाजशास्त्र विषयाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रस्तुत पुस्तकाची अभ्यासासाठी मोलाची मदत होईल अशी आशा आहे. जागतिकीकरणाच्या युगात भारतीय समाजांमध्ये परस्पर संबंध, प्रक्रिया, संस्था यांच्या रचनेत, कार्यपद्धतीत बदल घडून येत आहेत. भारतीय समाजातील व्यक्ती आणि समाज जीवनावर या बदलांचा प्रभाव पडला आहे. मानवी जीवन तंत्रज्ञान, साहित्य, कला याद्वारे सुसंपन्न झाले आहे. यासोबतच या समाजास विविध समस्यांनीही ग्रासले आहे. समाजात होणाऱ्या परिवर्तनाच्या गतीशी अनुकूलन साधताना अनेक सामाजिक घडामोडींचे, समस्यांचे आकलन महत्त्वाचे ठरते. या दृष्टीने भारतीय समाजाच्या होणाऱ्या अभ्यासाबद्दल आणि त्यातील सामाजिक घडामोडींबद्दल माहिती मिळविण्यासाठी प्रस्तुत पुस्तक उपयोगाचे आहे.
Bhartiya Sanvidhan First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: भारतीय संविधान प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Pramod Rajendra Tambeसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत प्रथम वर्ष बी.ए. (FYBA) अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामध्ये संविधानाचा उगम, स्वरूप, उद्देशिका, मुलभूत अधिकार, कर्तव्ये, व राज्याचे धोरणात्मक तत्वे या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्य मुद्दे: 1. भारतीय संविधानाचा उगम आणि महत्त्व: भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, संविधान सभेची रचना आणि त्याचा विकास. 2. संविधान उद्देशिका: लोकशाही, समता, स्वतंत्रता आणि न्याय यांची परिभाषा. 3. मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये: नागरिकांचे हक्क, सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदाऱ्या. आणि 4. राज्याचे मार्गदर्शक तत्वे: समाज कल्याणासाठी सरकारकडून पाळली जाणारी धोरणे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना संविधानाच्या महत्त्वपूर्ण बाबींचा सखोल अभ्यास व त्याचे व्यावहारिक परिणाम समजून घेण्यास प्रोत्साहन देतो.
Bhartiya Sanvidhanacha Parichay FYBA Second Semester - SPPU: भारतीय संविधानाचा परिचय एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Jyoti Bidlan Dr Pradip Deshpande Dr Pramod Tambe Prof. Haridas Arjun Jadhavएफ.वाय.बी.ए. राज्यशास्त्र जनरल पेपर - 1 या विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित 'भारतीय संविधानाचा परिचय' सत्र 2 हे पुस्तक आहे. भारतीय संविधानाचा परिचय या पुस्तकाच्या प्रकरण 1 मध्ये 'भारताचे कायदेमंडळ' म्हणजे संसद, त्याची संरचना, कायदेमंडळाचे अधिकार व कार्ये, राज्याचे विधानमंडळ, त्याची संरचना, अधिकार व कार्य तसेच संसद व विधानमंडळाच्या सदस्यांच्या पात्रता, अपात्रता इ. प्रकरण 2 मध्ये ‘कार्यकारी मंडळ’ यामध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळ यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिपरिषद, भारताचा महान्यायवादी यांच्या नियुक्ती, कार्यकाळ, पदावनती अधिकार व कार्य तसेच घटकराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिपरिषद व राज्याच्या महाधिवक्ता तसेच यांची नियुक्ती कार्यकाळ, पदावनती, कार्य व अधिकार हे पाहणार आहोत. प्रकरण 3 मध्ये 'न्यायव्यवस्था' यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांची स्थापना, संरचना, न्यायाधिशांची नियुक्ती, पात्रता, शपथ, पदावनती/महाभियोग प्रक्रिया , सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे अधिकार व कार्ये, न्यायालयीन पुनर्विलोकन आणि न्यायालयीन सक्रियता या संकल्पना पाहणार आहोत. प्रकरण 4 मध्ये 'निवडणूक व्यवस्था' यामध्ये निवडणूक आयोग त्याची निर्मिती, कार्य आणि भूमिका तसेच मुख्य निवडणूक आयुक्त व सध्या कळीचा मुद्दा/विषय असणारे निवडणूक सुधारणा या नवीन प्रकरणांची ओळख करून देणार आहोत.
Bhartiya Sanvidhanacha Parichay Paper 1 FYBA First Semester - SPPU: भारतीय संविधानाचा परिचय पेपर १ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Jyoti Bidlan Dr Pradip Deshpande Dr Pramod Tambe Dr Minal Kshirsagarएफ.वाय.बी.ए. राज्यशास्त्र जनरल पेपर-1 या विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित भारतीय संविधान परिचय सत्र-1 पुस्तक आहे. भारतीय संविधान परिचय यावर आधारित अनेक ग्रंथ, पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. सदर अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधान निर्मितीचा इतिहास, संविधान सभेचे कार्य, भारतीय संविधानाची प्रस्तावना व त्यातील महत्त्वाची तत्त्वे यांची ओळख, भारतीय संविधानाची वैशिष्टये, मूलभूत अधिकार त्यांची तरतूद व मानवी हक्कांविषयी तोंडओळख होण्याबरोबरच मूलभूत कर्तव्ये व राज्यधोरणांची मार्गदर्शक तत्त्वे हे प्राथमिक पातळीवर शिकणार आहोत. राज्या राज्यांमध्ये होणारे विविध संघर्ष, भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे बदल समजण्यासाठी तसेच भारतीय संघराज्याचे स्वरूप, वैशिष्टय त्याचबरोबर संविधान सुधारणांची संविधानामधील तरतूद, संविधान सुधारणा पद्धती, भारतीय संविधानातील मोठ्या संविधान सुधारणा व संविधानाची मूलभूत संरचना या नवीन प्रकरणांची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून करून घेणार आहोत.
Bhartiya Shasan Ani Rajkaran SYBA Third Semester - RTMNU: भारतीय शासन आणि राजकारण बी.ए. द्वितीय वर्ष तृतीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. R. J. Lote‘भारतीय शासन व राजकारण’ हे राज्यशास्त्र विषयाचे नवीन प्रस्तुत पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या जून २०१७ पासून सुरू होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. 'पंतप्रधान' हा या नवीन अभ्यासक्रमातील एक घटक अलीकडच्या काळात संसदीय शासन व्यवस्थेला पंतप्रधानीय शासन व्यवस्था असे स्वरूप प्राप्त झाले आहे. पंतप्रधान या पदाचे महत्त्व वाढले आहे. संसदीय शासनव्यवस्थेत 'पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ' हाच कार्यपालिकेचा केंद्र बिंदु आहे. राजकीय दृष्ट्या पंतप्रधान कितीही शक्तिशाली असला तरीही मंत्रिमंडळाची औपचारिक संमती प्राप्त केल्याशिवाय एकटा पंतप्रधान कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. ही वास्तवता लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकात पंतप्रधान या घटकाचे विवेचन करताना मंत्रिमंडळाचेही विवेचन केले आहे. भारतीय शासन व राजकारणाचे विश्लेषण करताना अलीकडच्या काळात घडलेल्या सर्व प्रमुख राजकीय घटनांचा परामर्श घेतला आहे. सेमिस्टर परीक्षा पद्धतीतील तिन्ही प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता विद्यार्थी-वाचकांमध्ये निर्माण होईल या हेतूने प्रस्तुत पुस्तकाचे लेखन केले आहे.
Bhashashuddhi - Novel: भाषाशुद्धी - कादंबरी
by Shri. Balarao Savarkarया पुस्तकांत वीर सावरकरांच्या भाषाशुद्धि या विषयावरील काही निवडक लेखांचे पुनर्मुद्रण करीत आहों. ह्यांतील बहुतेक लेखांचे पुस्तकरूपाने हे तिसरे पुनर्मुद्रण आहे यावरून या लेखांविषयींची मराठी वाचकवर्गाला वाटणारी अभिरुचि आणि आवश्यकता व्यक्त होत आहे. वीर सावरकर लिखित भाषा शुद्धी या पुस्तकामध्ये हिंदी, मराठी, संस्कृत, अरबी, फारशी, इंग्रजी, परराष्ट्रीय, उर्दू, पारशी, इत्यादी भाषांचे महत्व व त्या भाषांचे एकमेकांशी असलेले वेगवेगळे अर्थ आणि एकमेकांमधील फरक कसा आहे हे सविस्तर पणे दाखवले आहे.
Bhataji Ani Labad Manus
by Damodar Viththal PhapheThis is the story of priest and liar man. Priest gave god idol to man. When Priest asks for its idol to man, so he lie to priest . Read the story how the priest had taken back idol from liar man.
Bhau
by Madhuri PurandareGautam Radha and Tanmay were cousins. During holidays Radha used to go to her cousin's house and play with them. Gautam was a little mischievous and troubled Radha. All three were a good company. Their parents also enjoyed with them.
Bhavna Sudhare Janmojanm: भावना सुधारे जन्मोजन्म
by Dada Bhagwanजीवनव्यवहारात आपण सर्वांना असा अनुभव होत असतो कि जे नाही करायचे ते होऊन जात असते आणि जसे करायचे आहे तसे होत नाही ! जसेकी आपण निश्चय केला असेल कि , मला कोणालाही दु:ख दयायचे नाही , तरी पण आपल्याकडून दु:ख दिले जाते ! कठोरभाषा , टोचणारी भाषा नाही बोलायची , कोणाचा तिरस्कार नाही करायचे , विकारी भाव नाही करायचे .... तरी सुद्धा हे सर्व दोष आपल्याकडून होऊन च जात असतात . आणि तेव्हा मग आपण खूप हताश होतो , खेद होतो कि इतके धर्म केले , धार्मिक क्रिया केली , उपदेश ऐकले आणि त्याप्रमाणे आचरण करायचे निश्चय हि केला तरी देखील तसे होत का नाही ? ह्याचे रहस्य काय ? चूक काय ? त्यावर उपाय काय ? परमपूज्य दादाश्रींनी या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण एका नव्याच रीतीने , अगदी वैज्ञानिक पद्धतीने इथे दिले आहे . दादाश्री सांगतात , वर्तन हे गेल्या जन्मात केलेल्या भावांचे परिणाम आहे , हे परिणाम असे सरळ सरळ बदलता येत नाहीत , त्यासाठी ‘कारण’ बदल करायला हवे , अर्थात नव्याने भाव बदल करावे . आणि त्यासाठी दिली नवकलम रुपी भावना !! ज्यात दादाश्रींनी सर्व शास्त्रांचे सार समावून घेतले आहे . जन्मोजन्म सुधारणारी हि भावना भावल्यामुळे “भाव “ मुळापासून बदलेल आणि आंतरशांती राहणार . इतकेच नव्हे तर त्याने आपले कितीतरी दोष हि धुतले जातील ! दुनियेत कोणा बरोबर वैर रहाणार नाही . सर्वान बरोबर मैत्री होऊन जाईल , एवढी गजबची शक्ती ठेवली आहे दादाश्रींनी ह्या नवकलमा मध्ये ! किंमत समजली तर काम होऊन जाईल !
Bhet
by Jaysing ShindeBhet a story of an author who visits to Delhi for shopping. He meets Indrajeet and impressed by him.
Bhim Ani Maruti
by S. R. DevaleBhim was the strongest of all five brothers. He had developed pride about his strength, one day while traveling he came across long tail of Maruti. He asked him to pick it up with his weapon and fails over there. Bhim is ashamed and apologizes. Maruti forgave and advise him. Bhima said one thing, defend the poor using the power. Do not be rude and do not become a rash.
Bhintivarle Naach
by Shamim PadamasiThere was a girl named Sirvi. One day her parents had gone out Sirvi decides to finish all the housework at once to surprise her parents, but she is not able to do it. Sirvi meets some of the aliens they came from the moon. They helped her to finish her work. Later aliens will see some people and in fear. They fixed themselves on the wall like a picture. People come to see them.
Bhitara Sasa
by Bha. M. VaidyaThere was one Coward rabbit in the jungle. One day cloud comes together in the sky and loudly made a sound. rabbit scared and he very attempts to close the eyes but he didn't.
Bhogte Tyachi Chuk: भोगतो त्याची चुक
by Dada Bhagwanजो दुःख भोगतो त्याची चूक आणि जो सुख भोगतो ते त्याचे इनाम असते. पण भ्रांतीचा कायदा निमित्तास पकडतो. भगवंताचा कायदा हा खरा (रियल) कायदा, तो ज्याची चूक असेल त्यालाच पकडतो. तो कायदा तंतोतंत (अॅयक्झॅक्ट) आहे. व त्यात कोणी परिवर्तन करू शकणार असा नाहीच. जगात असा कुठलाच कायदा नाही जो कोणाला भोगयेला लावेल (दुःख देईल). जेंव्हा कधी आपल्याला आपल्या चुकीशिवाय भोगावे लागते, तेंव्हा हृदयास वेदना होतात आणि ते विचारत असतो - माझा काय अपराध आहे? मी काय चूक केली आहे? चूक कोणाची आहे? चोराची की ज्याचे चोरीला गेले त्याची? ह्या दोघांपैकी कोण भोगत आहे? "जो भोगतो त्याची चूक". प्रस्तुत संकलनात दादाश्रींनी "भोगतो त्याची चूक" चे विज्ञान प्रकट केले आहे. हे प्रयोगात आणल्याने आपल्या जीवनातील सर्व गुंतागुंती सोडवल्या जातील, असे हे अनमोल सूत्र आहे.
Bhole Hatti Sashyachi Yukti
by P. G. SahasrabuddheThere was a no water left in the lake and the elephants now traveled to another lake. On the way, they stamped on many rabbits and their houses. The rabbits wanted to change their residence out of fear. An elderly rabbit took the charge and shouted at the elephant. He told them that he has been sent down from the Moon to warn elephants not to travel this way otherwise they will be punished. The elephant obeys the order and bows down before the Moon as told.
Bholya Untacha Bali
by P. G. SahasrabuddheA lion had few friends and they hunt and brought food. All divided and ate the food. One day they had brought alive a baby of a camel. The lion liked it and kept it. One day it rained heavily and there was no food for them. So they decide to kill the camel. The lion was not happy but the other animals trick and eat the innocent camel.
Bhoplyanche Vajan
by Kalpana KulkarniA priest tried to use Mulla to carry a heavy load of Pumpkins on his head in exchange for a few good teachings. Mulla learns that he is simply making use of him to carry a heavy load freely. Mulla breaks all the pumpkins and teaches the priest a lesson.
Bhugol Bhutataki
by Rajiv TambeRaina was supposed to go to her friend’s house to study geography. Her friend loving Ghost also goes with her. When they were studying the television starts automatically and her teacher Joshi sir comes out of it. They start learning about geography and all are carried on a mat to show the geographical location.
Bhugol Class 10 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneभूगोल इयत्ता दहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये वस्तू नेमक्या कशा तयार झाल्या, त्या कोठून आल्या, या वस्तूंचा मूलस्रोत नेमका कोणता, मानव आणि निसर्ग यांच्या आंतरक्रियेतून मानवी जग कसे निर्माण होते, मानवी समूह, संस्कृती, समाज व अर्थकारण यांचा विकासाशी असणारा संबंध, आंतरजालाचा वापर, परिणाम इत्यादी बाबी या पाठ्यपुस्तकामध्ये समजाविल्या आहेत. या विषयातून आपण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास केला आहे. हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण, चिकित्सक विचार ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. जोपासा, नकाशे, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने दर्शविली आहेत.
Bhugol class 11 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneभूगोल इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात प्राकृतिक भूगोलाचा समावेश केला आहे, पृथ्वीच्या विविध भागात प्राकृतिक घटकांचे वितरण पाहायला मिळते. वैविध्यता व असमानता आढळते, विशिष्ट प्रारूप, त्याचे वर्णन व विश्लेषण करणे त्यावर आधारित भविष्यकालीन घटनांचा अंदाज बांधणे, शास्त्रीय मीमांसा करणे यांचेही ज्ञान या अभ्यासातून मिळते. आधुनिक बदल व त्यांचे महत्त्व जाणून घेणे. प्रात्यक्षिक भूगोलातही कालानुरूप बदल केले आहेत, ते तुम्हाला अद्ययावत तंत्राशी जुळवून घेण्यास उपयुक्त ठरतील. भूगोल हे निरीक्षणावर भर देणारे शास्त्र आहे असे म्हटले जाते. या विषयात निरीक्षण, आकलन, चिकित्सक विचार, विश्लेषण इत्यादी कौशल्ये महत्त्वाची आहेत.
Bhugol class 6 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneभूगोल इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भाने अनेक मूलभूत संकल्पना शिकणार आहात. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे मानवी व्यवहारांचे अनेक घटक तुम्हाला या विषयातून समजून घ्यायचे आहेत. हे नीट समजले तर त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण विविध मानवी समूहांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास करतो. हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. ती नेहमी वापरा, जोपासा. नकाश, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते, इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने आहेत.
Bhugol class 7 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneभूगोल इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भाने अनेक मूलभूत संकल्पना शिकणार आहात. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे मानवी व्यवहारांचे अनेक घटक तुम्हाला या विषयातून समजून घ्यायचे आहेत. हे नीट समजले तर त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण विविध मानवी समूहांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास करतो. हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. ती नेहमी वापरा, जोपासा. नकाश, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते, इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने आहेत.
Bhugol Class 8 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneभूगोल इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातून भूगोलाच्या थोड्या उच्च श्रेणीच्या संकल्पना दिलेल्या आहेत. बालपणापासून आकाशात दिसणारे ढग, पाऊस यांच्या संदर्भाने विशेष अभ्यास या पाठ्यपुस्तकात आहे. आपल्या नीलग्रहाचे अंतरंग कसे आहेत. मनुष्याने कशाच्या आधारावर अंतरंगाबाबत अनुमाने काढली याचे विवेचन या पाठ्यपुस्तकात थोडक्यात केले आहे. पृथ्वीचा सर्वात जास्त भाग व्यापलेल्या जलावरणातील जलाची गतीशीलता, प्रवाह व त्यांमागील प्रेरक शक्ती यांचा अभ्यास या पाठ्यपुस्तकात दिला आहे. हे सर्व घटक शिकण्यासाठी पाठ्यपुस्तकात अनेक कृती, उप्रकम दिले आहेत. विचारांवर चालणारे प्रश्न आणि पाठ्यपुस्तकात दिलेले नकाशे, चित्राकृतींचा वापर केला आहे, त्यामुळे भौगोलिक संकल्पना सोप्या होण्यास मदत होईल.
Bhugol class 9 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता नववीं - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneभूगोल इयत्ता नववीं हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये वस्तू नेमक्या कशा तयार झाल्या, त्या कोठून आल्या, या वस्तूंचा मूलस्रोत नेमका कोणता, मानव आणि निसर्ग यांच्या आंतरक्रियेतून मानवी जग कसे निर्माण होते, मानवी समूह, संस्कृती, समाज व अर्थकारण यांचा विकासाशी असणारा संबंध, आंतरजालाचा वापर, परिणाम इत्यादी बाबी या पाठ्यपुस्तकामध्ये समजाविल्या आहेत. या विषयातून आपण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास केला आहे. हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण, चिकित्सक विचार ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. जोपासा, नकाशे, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने दर्शविली आहेत.
Bhugol Digest class 10 - Maharashtra Board Guide: भूगोल डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन
by Shri Navneetभूगोल इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण नऊ अध्याय दिलेले आहेत. प्रत्येक पाठाच्या सुरुवातीस पाठाचा मुद्देसूद सारांश दिला आहे. सारांशात बऱ्याच ठिकाणी भारत व ब्राझील या देशांचा तौलनिक अभ्यास समजून घेण्यास सोपे व्हावे, यासाठी सारण्या दिल्या आहेत. प्रत्येक पाठात असणारे स्वाध्यायांतील प्रश्न व इतरत्र असणारे अनेक महत्त्वाचे अधिकचे प्रश्न अचूक उत्तरांसहित दिलेले आहेत. तसेच बोर्डाने प्रसारित केलेल्या सराव प्रश्नपत्रिकांतील बहुतांशी प्रश्न आणि मार्च २०१९ च्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आदर्श उत्तरांसह समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पाठ्यपुस्तकात प्रत्येक पाठात नकाशाशी मैत्री, चर्चा करा, पाहा बरे जमते का?, सांगा पाहू!, करून पाहा, शोधा पाहू !, जरा विचार करा, जरा डोके चालवा, द्वैताचे रंग असे शीर्षक असलेल्या अनेक चौकटी दिल्या आहेत. या चौकटींतील विषयांवर आधारित विविध प्रश्नांचा अचूक उत्तरांसहित या 'नवनीत'मध्ये यथायोग्य ठिकाणी समावेश करण्यात आला आहे.